अंबरनाथ ता. १४ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या पश्चिमेकडील आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. सहा महिन्यांपासून या केंद्रात पिण्यासाठी आणि शौचालयासाठी पाण्याची सोय नाही. यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील शिवनगर परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धनी केंद्रात पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना विकतचे पाणी घेऊन प्यावे लागते. स्वच्छतागृहासाठीही पाणी बाहेरूनच आणावे लागते. यामुळे महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी नसल्याने रुग्णांची तपासणी करतानाही अडचणी येतात. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा लागतो, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेमुळे सुमारे २० हजार नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी बबलू खान यांनी केली. आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी ५० लाख रुपये खर्च केले असतानाही, जर येथे मूलभूत सुविधा नसतील तर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा कशा मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अस्वच्छतेतून काढावी लागते वाट
आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्याना या घाणीतूनच वाट काढावी लागते. रात्रीच्या वेळी येथे गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर असल्याने दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र पडलेला असतो.
असुविधा लवकरच दूर
अंबरनाथ नगरपालिकेचे अभियंता विनोद राठोड यांनी या समस्येची दखल घेतली असून, आरोग्य केंद्रातील सर्व असुविधा लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नोट:- सोबत फोटो जोडलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.