मुंबई

आ. ह. साळुंखेंसह बाळ फोंडके होते स्पर्धेत

CD

आ. ह. साळुंखेंसह बाळ फोंडके होते स्पर्धेत
संमेलनाध्यक्षपदी मात्र विश्वास पाटील यांची निवड
मुंबई, ता. १५ ः सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली. या अध्यक्षपदाच्या प्रस्तावांमध्ये साताऱ्याचे सुपुत्र व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ साहित्य‍िक बाळ फोंडके आदींचाही समावेश होता; मात्र सर्वाधिक संस्थांनी विश्वास पाटील यांचेच नाव पाठवले होते, अशी मााहिती समोर आली आहे.
साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाल्यानंतर साहित्य‍िक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमांवर साहित्य‍िक, विचावंतांसह संघटनांनी निवडीवर टीका केली आहे. दुसरीकडे काही पुरोगामी संघटनांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा समितीने पाटील यांच्या निवडीचा निषेध नोंदवत संमेलनात महामंडळालाच जागा दाखविण्याचा इशारा दिला आहे. अध्यक्ष निवडीसाठी सर्वाधिक प्रस्ताव विश्वास पाटील यांच्यासाठी आल्याचे महामंडळाने आज स्पष्ट केले. इतर नावांबाबत मात्र भाष्य करण्यापेक्षा मौन बाळगले. काही संस्थांनी आपल्याकडून पाटील यांच्याऐवजी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या नावाचा ठराव पाठविल्याची माहिती दिली, तर काहींनी डॉ. बाळ फोंडके, वि. स. जोग, बाबा भांड, ऋषिकेश कांबळे, सुधाकर गायधनी आदींच्या नावांचेही प्रस्ताव दिले होते, अशी माहितीही दिली. दरम्यान, महामंडळानेच अध्यक्षपदासाठी पाटील यांच्यासाठी अन्य साहित्यिकांच्या नावांची चर्चा होऊ दिली नसल्याची टीका केली जात आहे. त्यावर अध्यक्षपदासाठी पाटील यांच्यासह इतरही नावे आली होती, मात्र सर्वाधिक प्रस्ताव पाटील यांच्या नावाचे असल्याने त्यांची निवड झाल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
----
माजी अध्यक्षांचे पाटील यांच्यासाठी प्रयत्न
मुंबईतील संस्थेने डॉ. बाळ फोंडके यांचा, तर छत्तीसगडमधील संस्थेने ज्येष्ठ साहित्य‍िक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता, असेही सांगण्यात आले. महामंडळाच्या माजी अध्यक्षांनाच हाताशी धरून विश्वास पाटील यांच्यासाठी मार्ग सुकर करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आल्याची चर्चाही साहित्यिक वर्तुळात रंगली आहे.
--
निवडीचे नियम काय आहेत?
महामंडळाकडे राज्यातील आणि राज्याबाहेरील संबंधित घटक संस्थांनी अध्यक्षासाठी तीन नावे द्यायची असतात. तसेच एका व्यक्तीचे नाव प्रत्येक समाविष्ट, संलग्न आणि सहयोगी संस्थांनी तसेच एका व्यक्तीचे नाव निमंत्रक संस्थेने आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांनीही एक नाव सुचविण्याचा नियम आहे. ही नावे सुचविताना संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या नावांचा समावेश असलेल्या ठरावांसह महामंडळाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर महिनाभरात महामंडळाकडे नावे पाठवायची असतात. कार्यवाहांकडून ती महामंडळ अध्यक्षांच्या अनुमतीने सभेसमोर मांडली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT