मुंबई

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची कुचंबणा

CD

नवगाव शाळेत सुविधांचा अभाव
पाणी, शौचालयाविना विद्यार्थ्यांची गैरसोय

डोंबिवली, ता. १६ : ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळील नवगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आज अनेक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अस्तित्वासाठी झगडत आहे. शाळेतील १६ ते १८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खेळताना हास्य असले तरी त्यांच्या मनात शाळेच्या दुरावस्थेबाबत भीती आहे. मधली सुट्टी झाली की मुलांना नैसर्गिक विधीसाठी आजूबाजूच्या शेतांचा आधार घ्यावा लागत आहे. शाळेतील शौचालयाची दुरवस्था झाली असून, ती वापरण्यायोग्य नसल्याने मुले-मुली बाहेर जात आहेत.

शाळेच्या परिसरातील शौचालयाची अत्यंत खराब अवस्था असून, ते वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे मुले आणि मुलींना मधली सुट्टी झाल्यावर नैसर्गिक गरजांसाठी शाळेबाहेर, जवळच्या शेतांमध्ये जावे लागते. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये गंभीर चिंता आहे, शिवाय शाळेत पिण्याच्या पाण्याची सोयही नसल्याने विद्यार्थ्यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यात एकूण १,३२८ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यावर्षी ११,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा प्रवेश घेतला असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये डिजिटलायझेशन, स्मार्ट क्लासेस, प्रयोगशाळा, शिक्षकांचे प्रशिक्षण, स्वच्छता, पौष्टिक आहार आणि क्रीडा साहित्य यांसारख्या अनेक सुधारणा केल्या आहेत, मात्र नवगाव जिल्हा परिषदेची ही शाळा या विकासापासून अगदी मागे पडली आहे.

१९८४ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या फक्त १६ ते १८ विद्यार्थी उपस्थित आहेत. येथे बहुसंख्य आदिवासी आणि गरीब कुटुंबांच्या मुलांचे शिक्षण होते. शाळेच्या भिंती उखडल्या आहेत, पाण्याच्या नळांतून पाणी येत नाही आणि शौचालय बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीचा उल्लेख काँग्रेसचे माजी प्रवक्ता ॲड. धनंजय जुन्नरकर यांनी समाजमाध्यमांवर केला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असून, दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र प्रत्यक्षात अद्याप शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही आणि मुलांना उत्तम शिक्षणासाठी तसेच सुरक्षित व स्वच्छ वातावरणासाठी अजूनही वाट पाहावी लागते आहे.

दोन दिवसांत दुरुस्ती
ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राखसे यांनी सांगितले, “नवगाव जिल्हा परिषदेची शाळा याच आठवड्यात दुरुस्तीच्या कामासाठी येत्या दोन दिवसांत हाताळली जाईल; मात्र या आश्वासनांची प्रत्यक्षात जलद अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळून शिक्षणाचा दर्जा सुधारेल.

सरकार शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्याची भाषा करते, पण मुंबईपासून काही अंतरावर ही भीषण वस्तुस्थिती आहे. गरीब मुलांचा विचार कोण करणार? याविषयी समाजमाध्यमातून आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राखसे यांनी या तक्रारीची दखल घेत दुरुस्तीला सुरुवात करत असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात आजही येथील शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. मुलांना योग्य सुविधा मिळण्याची आणखी किती वाट पाहावी लागणार.
- ॲड. धनंजय जुन्नरकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT