मुंबई

दहिसर टोलनाका स्थलांतराला विरोध

CD

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वारावर असलेला दहिसर चेकनाका वाहतूक कोंडीच्या कारणावरून स्थलांतर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील कार्यावाही सुरू करण्याचे आदेश दिले असून, दिवाळीच्या आधी तो स्थलांतर होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच केली आहे, मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केला आहे. या स्थलांतराने घोडबंदर गावातील रहिवाशांना कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

सध्या दहिसर टोलनाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी आणि सायंकाळी हा नाका ओलांडण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. टोलनाका बंद करावा अथवा तो स्थलांतर करावा, अशी सातत्याने मागणी केली जात होती. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही समस्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व संबंधितांची एक बैठक पार पडली. या बैठकीत टोलनाका दोन किमी लांब असलेल्या वरसावे खाडी पुलाजवळ स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीपर्यंत टोलनाका स्थलांतरित होईल, असे सरनाईक यांनी घोषित केले आहे, परंतु या स्थलांतराला घोडबंदरवासीयांनी विरोध केला आहे.

विरोधाचे कारण
मुळात स्थलांतराची जागा चुकीची आहे. ज्या ठिकाणी टोलनाका स्थलांतर होणार आहे, त्या जागी रस्त्याला चढ आहे. अशावेळी अवजड वाहने या चढावर टोल भरण्यासाठी थांबली, तर मोठीच समस्या होईल. दुसरीकडे सध्या दहिसर टोलनाक्यावर जेवढी जागा उपलब्ध आहे, तेवढी जागा नव्या जागी उपलब्ध नाही. परिणामी या ठिकाणी टोल भरण्यासाठी कोंडी होऊन सर्व वाहने घोडबंदर गावात शिरतील, अशी घोडबंदर गावातील रहिवाशांना भीती आहे.

टोल वाचविण्यासाठी गावातील मार्ग!
नव्या प्रस्तावित जागेच्या आधी एक रस्ता घोडबंदर गावातून जात असून, तो अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे टोलनाक्यावर कोंडी झाली किंवा टोल वाचविण्यासाठी अवजड वाहने गावातील रस्त्याचा वापर करून शकतात. त्याचा ग्रामस्थांना मोठाच मनस्ताप होणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर व स्थानिक रहिवासी चंद्रकांत वैती यांनी दिली.

विनाकारण टोल भरण्याची नामुष्की
दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर बसविण्यात आलेला टोलनाका मुंबईत बांधलेल्या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी आहे. असे असताना टोलनाका स्थलांतर केला, तर जी व्यावसायिक वाहने मिरा-भाईंदरमधून ठाण्याला अथवा वसईच्या दिशेने जाणार असतील, त्यांना मुंबईतल्या पुलांचा वापर न करताही टोल भरावा लागणार आहे, जे अन्यायकारक आहे, असा मुद्दा वैती यांनी उपस्थित केला आहे. टोलनाका स्थलांतराच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या टोलनाक्यालगतच मुंबई महापालिकेच्या जकात नाक्याची जागा सध्या मोकळीच आहे. टोलनाका त्या ठिकाणी स्थलांतर करावा, तसेच या टोलनाक्याकडे जाण्यासाठी अवजड वाहनांसाठी दोन स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवाव्यात, त्याचप्रमाणे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत. या सोप्या व जलद उपायांमुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न संपुष्टात येईल, तसेच टोलनाका स्थलांतराचा प्रश्नही निकाली लागेल.
- मुझफ्फर हुसेन,
वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT