मुंबई

पुढील बैठकीत रेल्वे उड्डाणपुलांसाठी निधीचा प्रस्ताव

CD

विरार, ता. १८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील कोंडी सोडविण्यासाठी रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार उड्डाणपुलांसाठी ८०० कोटींच्या निधीसाठी पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आमदार राजन नाईक यांना दिले आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जुलै रोजी विधानभवनात विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत फडणवीस यांनी ‘एमएमआरडीए’ला शहरामधील रेल्वे उड्डाणपुलांसाठी निधी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात आमदार राजन नाईक यांनी आयुक्त डॉ. मुखर्जी यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रेल्वेमार्गावरील चार उड्डाणपुलांबाबत सुमारे ८०० कोटींचा प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवण्याचे आश्वासन दिले.
नाईक यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या मदतीने पुलांच्या मंजुरीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वेकडून पुलांच्या डिझाईनला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ‘एमएमआरडीए’च्या महानगर आयुक्तांबरोबर विशेष बैठक घेतली.

या ठिकाणी होणार उड्डाणपूल...
वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोंडी दूर करण्यासाठी रेल्वेमार्गावर चार उड्डाणपुलांची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार नायगाव व वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान उमेळमान, वसई रोड ते नालासोपारादरम्यान अलकापुरी, नालासोपारा ते विरारदरम्यान ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

३६ वर्षांत केवळ १०० कोटींचा खर्च!
‘एमएमआरडीए’च्या हद्दीत वसई-विरार परिसराचा १९८८ मध्ये समावेश करण्यात आला, मात्र गेल्या ३६-३७ वर्षांत प्राधिकरणाकडून या परिसरात नागरी सुविधांबाबत केवळ १०० कोटींपर्यंत खर्च करण्यात आला. याकडे आमदार राजन नाईक यांनी लक्ष वेधले. तसेच भविष्यात या भागाला न्याय द्यावा, अशी विनंती आयुक्त डॉ. मुखर्जी यांच्याकडे केली, अशी माहिती जिल्हा महासचिव मनोज बारोट यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT