मुंबई

उल्हासनगरातील बॅरेक परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

CD

उल्हासनगर, ता. १८ (बातमीदार) : कॅम्प क्र. ४ मधील बॅरेक नं. १५७९, सेक्शन नं. २७ या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या चाव्यांमुळे वयोवृद्ध महिला, नागरिक आणि लहान मुलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येबाबत आमदार सुलभा गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवले होते. मात्र, अद्याप त्या पत्राची दखल घेतली नसल्याचे काँग्रेस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पवन मिरानी यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

नागरिकांवर विशेषतः वयोवृद्ध व लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत आमदार गायकवाड यांनी ५ फेब्रुवारीला महापालिकेला पत्र देऊन तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, संबंधित पत्राची दखल न घेता पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

जानेवारीपासून परिसरात भटक्या कुत्र्यांनी अनेक वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांच्या पायांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पवन मिरानी यांच्या मुलालाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मिरानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT