बदलापूर, अंबरनाथमध्ये आज पाणीपुरवठा बंद
बदलापूर, ता. १८ (बातमीदार) : जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, या कामासाठी एकूण २४ तासांचे शटडाऊन घेण्यात आले आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर त्याचबरोबर या तीनही शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र अंबरनाथ येथे गुरूवारी रात्री (ता.१८) १२ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. १९) रात्री १२ वाजेपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या काम होणार आहे. या काळात २४ तास हा पाणीपुरवठा बंद राहील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील बारवी गुरुत्ववाहिनीचे उन्नतीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा शटडाऊन घेतलेला आहे. त्यामुळे या दरम्यान या तीनही शहरातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ बदलापूर शहराला जो पाणीपुरवठा होतो, त्यातील काही भाग वगळता बहुतांश भागात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून पाणी जपून वापरण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.