योगिधाम परिसरात रस्त्यावर पाणी
निचरा होत नसल्याने गटारे तुंबले; नागरिक त्रस्त
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे जरी वेगाने सुरू असली, तरी या रस्त्यांच्या दुतर्फा पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने चित्र योगिधाम परिसरात पाहायला मिळत आहे. थोडासा पाऊस पडला तरी पाणी रस्त्यावर साचते त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
योगिधाम परिसरात गटारांचा अभाव, तसेच असलेल्या गटारांवर पदपथ बांधण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, पाणी रस्त्यावर साचते आणि सततच्या ओलाव्यामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात. या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघातांचा धोका वाढत आहे.
दुर्गंधी, रोगराईचा त्रास
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच गटारे साफ न झाल्यामुळे डासांचा प्रचंड प्रादुर्भाव होत असून, डेंगी, मलेरिया यांसारख्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या, तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष सुरूच आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे मागणी
भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा संयोजिका (बचत गट) पुष्पा रत्नपारखी यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र लिहून गंभीर परिस्थितीबाबत लक्ष वेधले आहे.
त्यांनी पत्राद्वारे गटारी नसलेल्या रस्त्यांवर त्वरित गटारी बांधण्यात याव्यात, गटारांची नियमित सफाई करण्यात यावी, पदपथांमुळे झाकल्या गेलेल्या गटारींचे झाकण उघडून निचऱ्याची सोय करावी,
पावसाळ्यापूर्वी सर्व गटारी मोकळ्या करून ठेवाव्यात अशा मागण्या केल्या आहेत.
उपाययोजना आवश्यक
शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीला योग्य पायाभूत सुविधा मिळण्यासाठी, रस्त्यांच्या गुणवत्तेबरोबरच निचऱ्याच्या व्यवस्थेवरही भर देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, कितीही वेळा रस्ते दुरुस्त केले तरी समस्या कायम राहणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.