अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : सैन्यदलात भरती होणे ही फक्त एका परिक्षेपुरती मर्यादित गोष्ट नाही. त्यासाठी सर्वांगीण विकास, वाचन, खेळ आणि शरीरसंपदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन वीरमाता शहीद कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या मातोश्री आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा गोरे यांनी केले.
इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स आणि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम जागृत करणे; तसेच सैन्यातील करियरची संधी समजावणे यावर व्याख्यान देण्यात आले. वेळेवर निर्णय न घेतल्यास युद्धाचे संकट निर्माण होते. भारताच्या इतिहासात वीर जवानांनी हुशारीने शत्रूंना पराजित केले आहे; त्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. भारतीय उपखंडावर अनेकदा शत्रूची आक्रमणे झाली; शांती हवी असली तरी शत्रू शांती समजत नसेल तर युद्धाचा मार्ग अवलंबावा लागतो, असे वीरमाता गोरे यांनी सांगितले. कार्यक्रमात एज्युकेशन संस्थेचे अशोक कुलकर्णी, दिलीप साठे, प्रा. भगवान चक्रदेव, इनरव्हील क्लबच्या हेमलता मोरे, भारती राजगुरू, स्मिता पाटील, निवृत्त नौदल अधिकारी, सुमारे ५०० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सभागृहातील प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा शेळके आणि अतुल कुसुबे यांनी केले.
जवानांसाठी कृतज्ञता बाळगा
समाजमाध्यमांचा मर्यादित वापर करा. शाळा आणि महाविद्यालयातील ज्ञान भविष्यासाठी वापरा आणि जवानांसाठी कृतज्ञता बाळगा, त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.