उच्चदाब वीजवाहिन्यांच्या कामावर
महापारेषण देणार लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईसह राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली वीज ग्रामीण भागात उभारल्या जाणाऱ्या सौर, पवन ऊर्जा प्रकल्पातून आणावी लागणार आहे. त्यासाठी नवीन उच्चदाब वीजवाहिन्या उभारण्याचे काम खासगी वीज कंपन्यांना दिले आहे. या आंतरराज्यीय पारेषण प्रकल्पांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय संस्था म्हणून नियुक्त करण्यास ऊर्जा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे दिलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊन राज्यात पुरेशी वीज मिळू शकणार आहे.
राज्यातील वीजग्राहकांकडून महावितरणकडे दररोज कमाल २७ हजार मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली जाते. अनेक ठिकाणी उद्योगधंदे वाढत असल्याने सौर-पवन ऊर्जा प्रकल्पात तयार होणारी वीज वाहून आण्यासाठी आवश्यक असलेले उच्चदाब वीजवाहिन्यांचे काॅरिडाॅर उभारण्याचे काम केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वीजदरावर आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.