कल्याणमध्ये राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या वतीने रविवारी (ता. ५) सार्वजनिक वाचनालय येथे पहिले राज्यस्तरीय वंजारी कविसंमेलन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे आणि कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी रवींद्र कांगणे हे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वंजारी समाजातील जास्तीत जास्त कवींनी या कविसंमेलनात सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीच्या साहित्य शाखेचे अध्यक्ष कवी रमेश आव्हाड यांनी केले आहे. कविसंमेलनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत ८१०४५५००८२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले पूर्ण नाव व पत्ता असलेल्या दोन स्वलिखित कविता आपल्या अल्प परिचयासह पाठवून नोंदणी करावयाची आहे. कविसंमेलनात सहभागी प्रत्येक कवीला प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरवर ८७७९८८७५३९ संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे सरचिटणीस अर्जुन डोमाडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.