‘दिवा जंक्शन’ पुस्तकाला कोळी बांधवांचा विरोध
लेखकावर कारवाईची मागणी
कळवा, ता. २३ (बातमीदार) ः ‘दिवा जंक्शन ः एक चरित्र आणि चारित्र्य’ या पुस्तकात आगरी कोळी समाजाविषयी खोटी, असत्य व बदनामीकारक माहिती प्रकाशित केल्याने दिवा परिसरातील स्थानिक बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक आगरी कोळी समाजबांधवाने या पुस्तक प्रकाशनाला विरोध केला असून, आगासन संघर्ष समितीतर्फे रोहिदास मुंढे व माजी नगरसेवक हिरा पाटील, आगरी कोळी समितीचे हेमंत पाटील, किरण दळवी यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात संबंधित पुस्तकाच्या लेखकावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी समाजातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. या पुस्तकातील मजकुरामुळे स्थानिक आगरी, कोळी समाजात तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पुस्तकाची चौकशी करून त्यावर बंदी घातली जाईल, असे आश्वासन मुंब्रा पोलिसांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.