मुंबई

रिक्षाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

CD

रिक्षाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
​अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) ः शहरात एका अज्ञात रिक्षाचालकाच्या बेदरकारपणामुळे एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण-कर्जत मार्गावर ही घटना गुरुवारी (ता. १८) रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. सुदर्शन अशोक जव्हेरी (वय ४७) हे मातोश्रीनगर येथे राहत असून ते पायी घरी जात असताना त्यांच्या मागून येणाऱ्या एका अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुदर्शन जव्हेरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्यांच्या शरीरावरही अनेक ठिकाणी मार लागला. त्यांना तातडीने उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुदर्शन जव्हेरी यांचा मुलगा आकाश सुदर्शन जव्हेरी यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT