मुंबई

नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यासाठी मागणीसाठी भूमिपुत्रांची ‘दिबा जागर

CD

नवरात्रोत्सवात ‘दिबा जागर’
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची भूमिपुत्रांची मागणी
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी अधिक तीव्र करण्यासाठी भूमिपुत्रांनी ठाणे, मुंबईतील नवरात्रोत्सव मंडपांमध्ये ‘दिबा जागर यात्रा’ सुरू केली आहे. यात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहोचून हा लढा अधिक तीव्र आणि मोठा करण्याचा प्रयत्न सुरू असून, लवकरच त्याला अतिविशाल रूप येईल, असा विश्वास भूमिपुत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील विमानतळाला तेथील भूमिपुत्रांनी जागा दिल्या आहेत. नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण मुंबई भूमिपुत्रांच्या जागेवर उभी असून देशाच्या विकासासाठी त्या जागा देऊ केल्या आहेत. मग त्या बदल्यात आमच्या आदर्शाचे, महाराष्ट्राला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा, वंचितांसाठी शिक्षण संस्था सुरू करणाऱ्या दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला दिले तर कोणाचे काय बिघडेल, असा सवाल उपस्थित करीत नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी ठाणे, मुंबई, भाईंदर, पालघर या ठिकाणी ‘दिबा जागर यात्रा’ सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात घोडबंदर रोडवरील वाघबीळ गावातून झाली. या यात्रेला भूमिपुत्रांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लवकरच यातून मोठा लढा उभा राहणार असल्याचे दिसते आहे.
बुधवारी (ता. २४) चेंदणी कोळीवाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, ठाणे (पूर्व) येथे ‘दिबा जागर यात्रे’चे आयोजन केले होते. यात्रेत सहभागी ठाणे शहरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या वाघबीळ गाव, बाळकूम गाव, कासारवडवली, मोघरपाडा, ओवळा, भाईंदर पाडा, हाजुरी गाव गावठाण, महागिरी कोळीवाडा, कळवा गाव, कोपरी गाव येथून आलेल्या विविध सामाजिक, समाज, जमात संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सामील होते.
या वेळी सर्व ठाणेकर भूमिपुत्रांचे चेंदणी कोळीवाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष कुणाल भोईर, उपाध्यक्ष मिलिना कोळी, चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे उपाध्यक्ष हेमंत कोळी यांनी मानाची टोपी घालून स्वागत करून यात्रेला शुभेच्छा दिल्या. ही यात्रा केवळ आंदोलन नसून भूमिपुत्रांच्या भावना आणि अस्मितेचा जागर असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.

...अन्यथा भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या विकासाकरिता भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या असून, शासनाला याची जाणीव नसेल तर ही भूमिपुत्रांसोबत केलेली गद्दारी आहे. त्यामुळे विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ असे नाव द्या अन्यथा भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, असे चेंदणी कोळीवाडा येथील भूमिपुत्र गिरीश साळगावकर यांनी सांगितले.

दि. बा. पाटील यांनी संसदेत आणि विधानसभेत अनेकदा नेतृत्व करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. राज्यातील स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायद्यामधून स्त्रीला संरक्षण दिले आहे. त्यांच्या नावासाठी केल्या गेलेल्या जागर यात्रेतून गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. गिरीश साळगावकर, भूमिपुत्र, चेंदणी कोळीवाडा, ठाणे

फोटो : ठाण्यात जनजागृती करताना भूमिपुत्र
कोट फोटो : डॉ. गिरीश साळगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT