मुंबई

माथाडी चळवळ कुणीही थांबवू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

CD

माथाडी चळवळ कुणीही थांबवू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
वाशी, ता. २५ (बातमीदार) : अण्णासाहेब पाटील या महापुरुषाने निस्वार्थ भावनेने सुरू केलेली माथाडी चळवळ आज लाखो कामगारांसाठी एक उज्ज्वल भविष्य घेऊन आली आहे. या चळवळीची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत, की कोणीही तिला थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केटमधील लिलावगृहात स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २५) आयोजित करण्यात आलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ गुणवंत माथाडी कामगारांचा ‘माथाडी भूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी धनादेशांचे वाटप करण्यात आले.
या वेळी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील आणि कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या विविध समस्या मांडल्या. सिडकोच्या घरांचा प्रश्न, नाशिक आणि पुणे येथील कामगारांचे प्रश्न यावर येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न, बाजार समित्यांमधील किरकोळ व्यापार आणि वडाळ्याच्या गृहनिर्माण प्रकल्पांवर निर्णय घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर जातीपातीचे राजकारण कमी करण्यासाठी आणि आरक्षणाबाबत न्याय देण्यासाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.
शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी केली. त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधून त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली. माथाडी कामगारांनी या नुकसानग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

मराठा तरुण नोकरी देणारे!
या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी पहिले बलिदान दिले. त्यांच्या योगदानाला स्मरून शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले आहेत आणि घेत राहणार आहे. ‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा समाजाचे हजारो अधिकारी तयार झाले असून, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही दिली जात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीड लाख उद्योजक तयार झाले आहेत. यामुळे आता मराठा तरुण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनले आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

SCROLL FOR NEXT