मुंबई

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत; पण जाहिरातींवर उधळपट्टी

CD

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत; पण जाहिरातींवर उधळपट्टी
वर्षा गायकवाड यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, शेतीतील पिके, शेतजमीन, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जमाफी करावी व सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत असताना महायुती सरकार मात्र पैसे नाहीत ही सबब सांगत आहे, तर दुसरीकडे मात्र जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारने ५३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही. या विभागाचा निधी बेकायदेशीरपणे दुसऱ्या विभागाकडे वळवून दलित, आदिवासी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, असे असताना या विभागाला प्रसिद्धीचा हव्यास हवा कशाला? आधी ज्यांच्यासाठी हा पैसा आहे, त्यांच्यासाठी खर्च करावा. विशेष म्हणजे राज्यावर नऊ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना देण्यास पैसे नाहीत, संजय गांधी निराधार योजनेसाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत आणि सरकार मात्र जाहिरातबाजीवर उधळपट्टी करीत आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

Mumbai Crime: 'सकाळ'च्या वृत्तमालिकेचा इम्पॅक्ट! अखेर ‘बाबा खान बंगाली’ला अटक, कारशेडमधील सुरक्षा वाढवणार

SCROLL FOR NEXT