मुंबई

मंत्रालयात सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

CD

सरकारी नोकरीच्या प्रलोभनाने तरुणाची फसवणूक
मृत्यूनंतर उघडकीस आले प्रकरण; गुन्हा दाखल
बोईसर, ता. २५ (बातमीदार) : मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देण्याच्या प्रलोभनाने विक्रांत केशव ठाकरे (वय २४) याची २.२० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण त्याच्या मृत्यूनंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी विक्रांतची बहीण मयूरी लाटे हिने बोईसर पोलिस ठाण्यात सौरभ आप्पा नावाच्या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विक्रमगड येथील विक्रांतची ओळख २०२३मध्ये मोहित पवार यांच्या माध्यमातून सौरभ आप्पाशी झाली होती. सौरभने स्वतःची मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे भासवून विक्रांतला लिपिक पदावर नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी त्याने त्याच्याकडून २.२० लाख रुपये घेतले. त्याने दोन वेळा विक्रांतला मंत्रालयात नेत बाहेर बसवून ठेवले आणि ‘साहेब उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियुक्तीपत्र मिळणार नाही’ अशी कारणे दिली. सातत्याने होणारी फसवणूक व मानसिक तणावामुळे विक्रांतचा २१ मार्च २०२४ रोजी बोईसरहून घरी परत येत असताना झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला.
भावाच्या मृत्यूनंतरही सौरभने पैसे परत केले नाहीत. त्याने खात्यात पुरेसे पैसे नसतानाही चेक देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर मयूरी लाटे यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT