मुंबई

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर पूर्णविराम, शेवटच्या फेरीत 9 हजार 552 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

CD

अकरावीच्या प्रवेशांना अखेर पूर्णविराम

मुंबई, ता. २५ ः राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजअखेर पूर्ण झाली. शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या या प्रवेशाच्या अखेरच्या अंतिम विशेष फेरीत नऊ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अकरावीच्या प्रवेशाची ही विभागाकडून देण्यात आलेली अखेरची संधी होती. आज ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांत राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यासाठी एकूण दहा फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यात मुख्य केंद्रीय प्रवेशाच्या कॅप फेऱ्या चार, ओपन टू ऑलच्या दोन, अंतिम विशेष फेरींसह एकूण चार विशेष फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या मुख्य कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेशांची संख्या खूप कमी होती, तर ओपन टू ऑल आणि विशेष फेऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रवेशाची नोंद झाली. अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी २४ सप्टेंबर मुदत देण्यात आली होती. त्यात कला शाखेसाठी ३,२०१ तर वाणिज्य शाखेसाठी २,६३६ आणि विज्ञान शाखेसाठी ४,९९४ असे मिळून एकूण १०,८३१ विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयाचे अलॉटमेंट करण्यात आली. यात कोट्याअंतर्गत ७३७ इतके प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. पालकर यांनी दिली.
...
आठ लाख जागा रिक्त
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ५९ हजार २३२ इतक्या प्रवेशाच्या जागा होत्या. त्यासाठी १४ लाख ८५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी आतापर्यंत १३ लाख ४२ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतले आहेत. अद्यापही आठ लाख १६ हजार ४९८ जागा प्रवेशापासून रिक्त राहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT