विधीच्या पाच वर्षे पदवीचे प्रवेश पूर्ण
मुंबई, ता. २५ : राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विधीच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. विधी प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात १३ हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १० हजार २६ जागांवर एकूण प्रवेश झाले असून, उर्वरित तीन हजार ५६३ जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यंदाच्या पदवी प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलकडून प्रवेशाच्या चार कॅप फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या पाच वर्षांच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांनी अनेक महाविद्यालयांना पसंती दर्शवत पसंतीक्रम दिले. तर अल्पसंख्याक आणि खासगी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातील असंख्य जागा अखेरच्या चौथ्या फेरीपर्यंत रिक्त होत्या, ज्या जागांवर अखेरच्या फेरीत शेवटच्या दिवशी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत.
विधी-पाचसाठी झालेली प्रवेश प्रक्रिया
कॅप फेरी अलॉटमेंट झालेले प्रवेश
१ - ८,०८८ - ३,०९०
२ - ४,७१४ - १,४११
३ - ५,४५३ - ३,१६९
४ - २,३८५ - २,३५६
झालेले एकूण प्रवेश - १०,०२६
एकूण प्रवेश क्षमता झालेले प्रवेश रिक्त जागा
१३,५८९ १०,०२६ ३,५६३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.