अतिवृष्टीने फळांचा हंगाम लांबणीवर
राज्यभरातील द्राक्ष, कलिंगड, टरबूज यांचे मोठे नुकसान
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) ः राज्यात पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वेलवर्गीय फळांचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष, कलिंगड, टरबुजाचे उभे पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नवी मुंबईच्या बाजारात राज्यभरातील विविध भागांतून भाजीपाला, फळे येत असतात. त्यात मुंबई बाजारात नाशिक, पुण्यासह सातारा, सांगली भागातून नियमितपणे कृषिमालाची आवक होत असते. कलिंगड, खरबुजासारखी वेलवर्गीय फळे जमिनीवर वाढतात किंवा जमिनीपेक्षा काही ठरावीक अंतरावर वाढतात. अशातच सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फळांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने यंदा बाजारात फळे येण्याची शक्यता कमी आहे.
------------------------------
द्राक्ष बागायतदारांना फटका
द्राक्षांचा हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे यंदा बाजारात द्राक्षांचे आगमन उशिराने होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
द्राक्षांच्या बागा पाण्यात भिजून गेल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून बाजारात येणारी द्राक्षे वेळेवर येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षांचा हंगाम लांबणीवर गेला आहे.
-------------------------------
अतिवृष्टीमुळे द्राक्षाच्या बागा पाण्याखाली गेल्या आहेत. पाऊस थांबल्यावर लागवड झाल्यावर उत्पादन घेता येणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणारी द्राक्षांची आवक जानेवारीवर गेली आहे.
- किरण जगताप, फळ व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.