ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला प्रतिसाद
४,९४१ ग्राहकांनी बसवले सौरऊर्जा प्रकल्प
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) ः ठाणे, पालघर जिल्ह्यातील ४,९४१ वीज ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत सौरऊर्जा योजनेत सहभागी होत आपल्या घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. या योजनेंतर्गत दोन्ही जिल्ह्यांत एकूण ९,५०० ग्राहकांनी अर्ज केले असून लवकरच त्यांच्याही घरांवर सौर प्रकल्प लावले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून दररोज १८.६५ मेगावॉट तर पालघर जिल्ह्यातून ८.४७ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होत आहे.
योजनेत तीन किलोवॉटसाठी शासनाकडून ७८,००० रुपये अनुदान दिले जाते, तर निवासी कुटुंबांसाठी एक किलोवॉटवर ३० हजार रुपये अनुदान मिळते. जर ग्राहकांनी तीन किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेसाठी अर्ज केला तरीही त्यांना ७८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्था व रहिवासी संघटनांना सामायिक जागेवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॉट दराने अनुदान दिले जाते. महावितरणकडून रूफटॉप सोलरसाठी नेट मीटर मोफत दिला जातो आणि आलेल्या अर्जांना जलद मंजुरी देण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना कोणतीही सोलर कंपनी निवडण्याची मुभा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी https://www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
सौरऊर्जा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आहे. यामुळे ग्राहकांचे वीजबिल जवळपास शून्य होते. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.