मुंबई

ठाण्यात पावसाचा गरबा

CD

ठाण्यात पावसाचा गरबा
रविवारी जोर कायम; सखल भागात पाणी साचले

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः हवामान विभागाने रविवारपासून पुढील तीन दिवस रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यानुसार शनिवारी (ता. २७) रात्रीपासून ठाणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने रात्री साडेबारादरम्यान दमदार हजेरी लावली होती. त्या तीन तासांत तब्बल ८९.२४ मिमी पावसाची नोंद झाली. या झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात प्रामुख्याने पाणी साचले होते. तर रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सातत्याने पाऊस सुरूच होता. त्यातच रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांनी बाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तर ठाणे शहरात एकीकडे पाऊस सुरू असताना दुसरीकडे त्याच जोरदार पावसातही रास गरब्याला रंग चढल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळाले.

दरम्यान, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक आणि पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, पावसाळ्यात झाडाखाली थांबणे टाळावे, तसेच नदी आणि नाल्यांचे पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना शासन आणि प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.

हवामान विभागाने ठाण्यासह मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यातच शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही क्षणात पावसाचा जोर चांगला वाढल्याचे पाहण्यास मिळाले. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत एकूण ११५.७९ मिमी पावसाची नोंद झाली. तर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत (सात तासांत) ६४.७७ मिमी पाऊस झाल्याने आतापर्यंत एकूण ३१३५.११ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

ठाणे शहरात चार ठिकाणी पाणी साचले होते तर तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून यामध्ये दोन रिक्षांचे नुकसान झाले आहे. तसेच एका ठिकाणी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली असून त्या भिंतीसोबत तेथील सहा झाडे नाल्यात पडली आहेत. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

संरक्षण भिंतीमुळे सहा झाडे नाल्यात
शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मानपाडा टिकुजिनीवाडी येथील नीलकंठ ग्रीन सोसायटीची सुमारे १५० फूट लांब व २० फूट उंच संरक्षक भिंत पडली. त्या भिंतीलगत असलेली पाच ते सहा झाडे जवळच असलेल्या नाल्यामध्ये पडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावली आहे. दरम्यान, कोपरी पूर्व या ठिकाणी सरस्वतीनगरी सोसायटीची संरक्षक भिंत पडली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

पाणीच पाणी
शहरात जोरदार पाऊस झाल्यावर प्रामुख्याने सखल भागात पाणी साचते. त्याचप्रमाणे वंदना टॉकीज परिसरात, जांभळी नाका, कोपरी आणि घोडबंदर रोडवरील चितळसर पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर अशा चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

दोन गाड्यांचे नुकसान
ठाणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत तीन झाडे कोसळली होती. यामध्ये दिवा स्थानक रोड परिसरात पार्क केलेल्या दोन रिक्षांवर शेवग्याचे झाड कोसळले. यामुळे त्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. याशिवाय दिवा, आसनगाव रोड आणि चेंदणी कोळीवाडा येथे झाड उन्मळून पडले आहे. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच पडलेली झाडे तातडीने एका बाजूला करण्यात आली आहे. ढोकाळी नाका या ठिकाणी रविवारी दुपारी सुटलेल्या वाऱ्यामुळे लोखंडी कमान पडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षेने धाव घेत ती कमान बाजूला केली.

तुरळक वाहतूक कोंडी
गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीचे चित्र वारंवार पाहायला मिळत असताना, रविवारी पावसामुळे शहरात तुरळक प्रमाणात वाहतूक कोंडीचे चित्र दिसत होते. एकीकडे रेड अलर्ट जाहीर केल्याने नागरिकांनी शक्यतो बाहेर पडणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT