बोर्डी, ता. २९ (बातमीदार) ः जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने शनिवारी (ता. २७) रात्रीपासून बंद पडलेला वीजपुरवठा १४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ववत करण्यात वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. बोर्डी शाखा अभियंता मदन पद्मिनी यांनी या कामी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले.
शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बोर्डी आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे या भागातील वीजपुरवठा बंद पडला होता. या घटनेची तातडीने दखल घेऊन महावितरण कंपनीने कोणत्या भागात बिघाड झाला आहे, यासाठी शोधमोहीम सुरू केली होती. मुसळधार पावसामुळे या कामात खंड पडत होता. अखेर रात्री उशिरा काम थांबून रविवारी (ता. २८) सकाळपासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वाहिन्यांची चाचणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बोर्डी, घाई, बोरगाव, रामपूर, घोलवड, अस्वली भागांमधील सेवा सुरू करण्यात यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.