पालघर वीजवाहिनी प्रकल्पासाठी वाढीव नुकसानभरपाई
रेसोनीया कंपनीच्या प्रकल्पासाठी सुधारित दर जाहीर; शेतकऱ्यांना मोठा लाभ
पालघर, ता. ३० (बातमीदार) ः खवडा गुजरात ते पडघा यादरम्यान उच्चदाब वीजवाहिनी उभारली जाणार आहे. हा प्रकल्प उभारणाऱ्या रेसोनीया कंपनीने शेतकऱ्यांना प्रशासनाने निश्चित केलेल्या सुधारित दरांनुसार नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. हे दर आधीच्या तुलनेत तब्बल १५ ते २० पट जास्त असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील व भिवंडीमधील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि आमदार शांताराम मोरे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या मागणीला रेसोनीया लिमिटेडने पाठिंबा देत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुधारित दर निश्चित करण्यात आले.
१० ते २० पटींनी वाढ
यंदाच्या मे महिन्यात झालेल्या आधीच्या मूल्यांकनाच्या तुलनेत अनेक गावांमध्ये नुकसानभरपाईचे दर तब्बल एक हजार टक्क्यांनी म्हणजेच १० ते २० पट वाढले आहेत, तर संबंधित तालुक्यातील सर्व गावांना एकसमान ६२७ प्रति चौ.मी. दराने नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यात वाडा, ससाणे, मुंगुस्ते, जव्हार भागाचाही समावेश आहे.
मालकी हक्क शेतकऱ्यांकडेच
या नुकसानभरपाईनंतरही जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्यांकडेच राहील आणि टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुन्हा शेती करू शकतील. याशिवाय टॉवर उभारणीदरम्यान पिकांची जी नुकसानभरपाई आहे ती स्वतंत्रपणे दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.