मुंबई

पावसाने भाजीपाल्याला झोडपले

CD

पावसाने भाजीपाल्याला झोडपले
सणासुदीच्या काळात भावात २० टक्क्यांनी वाढ
ठाणे, ता. ३० (बातमीदार) ः मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके चिखलात दडपल्याने राज्यभरातील भाजीपाल्याची आवक ठप्प झाली आहे. ठाण्यातील बाजारपेठेतही त्याचा थेट फटका बसल्याने पालेभाज्यांसह इतर भाज्यांचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांची जुडी ३० ते ५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. तर फ्लॉवर, कोबी, वांगे, टोमॅटो यांच्या भावात तब्बल १० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींच्या बजेटचे गणित बिघडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बाजार समितीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे खराब भाज्या येत असल्याने काही भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, माठ, अळूची पाने, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी यांसह इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. या दरवाढीमुळे व्यापाऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढील आठवडाभर बाजारात आवक कमी राहणार असून, दर १० ते २० रुपयांनी किलोमागे वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

ठाण्यातील बाजार पेठांमधील
आधीचे दर
• मेथी रु ४० एक जुडी
• शेपू रु ३० एक जुडी
• कोथिंबीर रु ३० एक जुडी
• पालक रु २० एक जुडी
• कांद्याची पात रु २० एक जुडी
• वांगे रु २५ अर्धा किलो
• फ्लॉवर रु ४० एक
• पत्ता कोबी रु ३० एक
• भेंडी रु ४० किलो
• कारले रु ३० किलो
• टोमॅटो रु ६० किलो
• शिमला मिरची रु ३० किलो
• लिंबू रु २० एक मोठा तर रु २० चे ३ छोटे
• आले रु ५० किलो
• दुधी भोपळा रु ६० एक
• कांदे रु ५० किलो
• बटाटे रु ४० किलो
• लसूण रु ६० किलो
• काकडी रु ४० किलो
• माठ रु २० जुडी
• अळूची पाने २० जुडी

सध्याचे दर
• मेथी रु ५० एक जुडी
• शेपू रु ४० एक जुडी
• कोथिंबीर रु ४० एक जुडी
• पालक रु ३० एक जुडी
• कांद्याची पात रु ३० ते रु ५० एक जुडी
• वांगे रु ७० अर्धा किलो
• फ्लॉवर रु ५० एक
• पत्ता कोबी रु ४० एक
• भेंडी रु ४० किलो
• कारले रु २० किलो
• टोमॅटो रु ७० किलो
• शिमला मिरची रु ४० किलो
• लिंबू रु १० चे २ मोठे तर रु २० चे ४ छोटे
• आले रु ६० किलो
• दुधी भोपळा रु ४० एक
• कांदे रु ३० किलो
• बटाटे रु ३० किलो
• लसूण रु ५० अर्धा किलो
• काकडी रु ४० किलो
• माठ रु ३० जुडी
• अळूची पाने ३० जुडी

गृहिणी त्रस्त
दोन दिवसांवर दसरा आहे. पण, भाज्यांच्या भाववाढीमुळे रोजच्या जेवणात एक तरी भाजी परवडेल का अशी खंत ठाणेकर गृहिणींनी यावेळी बोलून दाखवली. किरकोळ बाजारात एकही भाजी पंचवीस रुपये पाव किलोच्या खाली मिळत नाही. सर्वच भाज्यांच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे स्वयंपाक घराचे बजेटही हलल्याचे अनेक गृहिणींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

Kolhapur building slab collapse : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; अनेकजण अडकल्याची भीती

V. S. Gaitonde : मराठी माणसाने काढलेलं चित्र चक्क 67 कोटींना, कोण होते जगप्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे?

Pune News : जिल्हा परिषदेची शाळा ठरली जगातील सर्वोत्तम; जालिंदरनगरच्या शाळेला मिळणार एक कोटी रुपये

Pune University : विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे निघाले वाभाडे! विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होणार

SCROLL FOR NEXT