उद्योजक हा नवनिर्मिती करणारा असावा ः डॉ. विलास जाधव
वाणगाव, ता. ३० (बातमीदार) : व्यवसाय यशस्वी करण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. उद्योजक हा नवानिर्मिती करणारा असावा. मार्केटिंग करण्यासाठी एकत्र राहून समाजमाध्यमांचा प्रभावीपणे योग्य वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले. ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विलास जाधव यांनी उद्योजकता विकास याविषयी मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत तीनदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामीण युवक तसेच महिला बचत गटातील सदस्यांचा सहभाग लाभला.
कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञा रूपाली देशमुख यांनी ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांचे वाढते महत्त्व, त्यातून होणारे मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या तीनदिवसीय प्रशिक्षणादरम्यान फळे व भाजीपाला प्रक्रिया, जॅम, जेली, लोणची, पापड, मसाले प्रक्रिया, खाद्यसुरक्षा व मानके, स्वच्छता, पॅकेजिंग तंत्रज्ञान, ब्रँडिंग व विपणन धोरणे या विविध विषयांवर रूपाली देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सहभागी शेतकरी व महिलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध प्रक्रिया उत्पादने तयार करण्याचे कौशल्य शिकविण्यात आले. तसेच, आर्थिक सहाय्य, कर्ज सुविधा व अनुदानाच्या संधी याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.