२७ गावांतील ४९९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कल्याण ग्रामीणमधील कामगारांसाठी आजचा दिवस विजयाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला. कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ४९९ कामगारांना अखेर नियुक्तीपत्रे मिळाली, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कामगारांच्या आशा पूर्ण झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हा विषय मार्गी लागल्याने कामगार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांनी दोघांचे विशेष आभार मानले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पार पडलेल्या या कार्यक्रमात आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त हर्षल गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपतालुकाप्रमुख गजानन पाटील, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, गुलाब वझे, दत्ता वझे, जलिंदर पाटील, मोरेश्वर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश मोरे यांनी म्हटले की, हा दिवस केवळ नियुक्तीचा नाही, तर कामगारांच्या हक्काचा विजय आहे. त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला असून हा आनंदाचा, समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” असे ते म्हणाले. या नियुक्तीमुळे शासकीय प्रक्रियेत गुंतलेले अनेक वर्षांचे अडथळे दूर झाले असून, कामगारांना आता अधिकृत ओळख, स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षितता लाभणार आहे. कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह झळकत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.