दिबांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक
प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर, निवडणुकीत पडसाद उमटणार
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने चुप्पी साधली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांची आहे. राज्य सरकारने नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे; मात्र विमानतळासाठी इतर दोन अतिरिक्त नावे आल्याचा दावा खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देत नाहीत तोवर विमान उडू देणार नाही, असा पवित्रा खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतला आहे. तर नावाबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळताना शहरात दिशादर्शक फलक लावण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारांमुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष आहे.
--------------------------------------
सत्ताधाऱ्यांसाठी इशारा
- नवी मुंबई विमानतळावर सोमवारी (ता. ६) भूमिपुत्र धडकणार आहेत. या आंदोलनाची तयारी जोरात सुरू आहे; पण भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर विश्वास ठेवत आंदोलनाच्या तयारीतून स्वतःला चार हात लांब ठेवले आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.
- एमएमआर क्षेत्रात आगरी-कोळीबहुल भाग असून आठ महापालिकांसह अनेक नगरपालिकांवर स्थानिक भूमिपुत्रांचा प्रभाव आहे. त्यामुळे आश्र्वासित केल्याप्रमाणे जर दि. बा. पाटील यांच्याव्यतिरिक्त इतर नाव दिल्यास त्याचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.