कासा, ता. २ (बातमीदार) : फेरीवाल्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पंतप्रधान फेरीवाला आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) या योजनेचा कालावधी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत होता, मात्र तो वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे डहाणू शहरासह तालुक्यातील हजारो फेरीवाले, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अधिक काळासाठी मिळणार आहे.
या योजनेत सुधारणा करून कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० हजारऐवजी १५ हजार रुपये, दुसरा टप्प्यात २० हजारऐवजी २५ हजार रुपये आणि तिसरा टप्प्यात ५० हजारांची कर्जरूपी मदत करण्यात येणार आहे. याशिवाय वेळेवर हप्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय आधारित क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. त्याद्वारे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय किंवा वैयक्तिक गरजांसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच डिजिटल व्यवहारांवर एक हजार ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी राबविलेल्या या योजनेमुळे त्यांच्या जगण्याला दिलासा मिळणार असून अनेकांना स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार आहे.
प्रशिक्षणासह सुविधा मिळणार
फेरीवाल्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर विविध कौशल्य प्रशिक्षणाचाही लाभ मिळणार आहे. उद्योजकता, आर्थिक साक्षरता, डिजिटल व्यवहार कौशल्ये व मार्केटिंग या विषयांवर कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. शहरातील फेरीवाले विक्रेत्यांसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या साह्याने स्वच्छता व अन्नसुरक्षा प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यासाठी डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडदे यांनी सांगितले की, फेरीवाले, हातगाडीधारक आणि छोटे उद्योजकांनी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा. यामुळे केवळ आर्थिक सशक्तीकरणच नव्हे, तर डिजिटल पद्धतीने व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.