संकटातील शेतकऱ्याला मदतीचा हात
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : मुसळधार पावसामुळे बळीराजावर संकट ओढावले आहे. शेती पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. परिणामी, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनीही शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली.
अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील खारेपाट व अन्य भागातील भातपीक पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याच अनुषंगाने शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (ता.१) खारेपाटातील नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी केली. शहापूर, धेरंड येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची सूचना केली. यावेळी शेकाप शेतकरी तालुका सभा अध्यक्ष अनिल पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, राजन पांचाळ, विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.
----------------------------------
नुकसान भरपाईसाठी आक्रमक
शेतकरी कामगार पक्ष कायमच तळागाळातील घटकाशी बांधिलकी जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून शेकापची ख्याती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेकाप आक्रमक झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.