मुंबई

चौक वडापावमध्ये पाल प्रकरणी अन्न व प्रशासन विभाग सुस्त

CD

वडापावमध्ये पाल आढळली; अन्न व प्रशासन विभाग सुस्त
खालापूर, ता. २ (बातमीदार) : चौक येथील उजाला हॉटेलमध्ये वडापावमध्ये मृत पाल आढळल्याच्या गंभीर घटनेनंतरही हॉटेल सुरू राहिल्याने अन्न व प्रशासन विभागाच्या (एफडीए) सुस्त कारभारावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याप्रकरणी एफडीएला जाग आणण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे आणि गजानन साळवी यांच्यासह चौक येथील ग्रामस्थांनी पेण येथील अन्न व प्रशासन विभागाचे कार्यालय गाठले. सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी खालापूर विभागाचा कार्यभार असलेल्या निकम यांच्याशी संपर्क साधला.
निकम यांनी संबंधित हॉटेलमालकावर दंडात्मक कारवाई केल्याचे आणि परवाना रद्द करणार असल्याचे सांगितले, मात्र ग्रामस्थांनी कारवाईबाबत लेखी माहिती मागितल्यावर टाळाटाळ झाल्याने प्रत्यक्षात कारवाई झाली की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एवढी मोठी घटना घडूनदेखील अन्न व प्रशासन विभाग शांत बसल्याने पेण येथील कार्यालय गाठावे लागले. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
-सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT