बिर्ला महाविद्यालयात शांती यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या यूजीसी अनुदानित गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक अहिंसा दिनाचे औचित्य साधून भव्य शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे विसावे वर्ष असून, गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
यात्रेची सुरुवात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. सुसज्ज शांतिरथावर महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली.
यात्रेत महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएस, वाणिज्य, कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह उर्दू नॅशनल हायस्कूल व इतर संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात गांधी विचारांचे फलक आणि संदेश देणारी पत्रके घेत रस्ता भरून शांततेचा आणि अहिंसेचा संदेश दिला. ‘रघुपती राघव राजा राम’ आणि इतर गांधीजींच्या आवडत्या भजनांच्या गजरात संपूर्ण परिसरात आध्यात्मिक व सामाजिक जाणीव निर्माण झाली.
अतुल झेंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले, की गांधीजींचे विचार हे आजच्या काळात अधिक आवश्यक आहेत. डॉ. नरेश चंद्र यांनी गांधी तत्त्वज्ञानाचे वर्तमानाशी नाते उलगडले, तर प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांनुसार जीवन जगावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अहिंसेचे पालन आणि सामाजिक सौहार्द राखण्याची शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.