मुंबई

मुरबे बंदर जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी

CD

पालघर, ता. २ (बातमीदार) : मुरबे या गावात बंदर प्रस्तावित असून, त्यांची जनसुनावणी पालघर येथे ६ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. ही जनसुनावणी होत असताना कुठलेही प्रकारे सरकार उद्योग अथवा बंदर विभागाने किमान बाधित होत असणाऱ्या गावांना विश्वासात घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह परिसरात संतापाची लाट आहे. याच अनुषंगाने जोपर्यंत सरकार पुढाकार घेऊन किमान बाधित होणाऱ्या गावांबाबत सरकारचे उद्योगाबात धोरण काय आहे व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, तोपर्यंत जनसुनावणी घेऊ नये, अशी आग्रही मागणी व भूमिका पंचक्रोशीतील सरपंच, लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांना भेटून निवेदन दिले. सरकार, तसेच संबंधित विभागाला कळवले जाईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी जाखड यांनी मांडली. या वेळी कुंदन संखे, वैभव संखे, उमरोळी सरपंच प्रभाकर पाटील, कुंभवली सरपंच तृप्ती संखे, पंचाळी गावचे रवींद्र पाटील, उपसरपंच मिनेश पाटील, कोळगाव सरपंच कुणाल पाटील, दापोली सरपंच हेमंत संखे, कोलवडे सरपंच कुंजल संखे, उपसरपंच आकाश संखे, उमरोळी गावचे अनिल तरे, माजी उपसरपंच अमित संखे, भौतेश पाटील, सुमित पिंपळे, राहुल संखे यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या खासदारांचे १ महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी

SCROLL FOR NEXT