सोनाली लोहार यांच्या ‘बाकी काही नाही’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
ठाणे, ता. ५ (बातमीदार) : सृजनसंवाद प्रकाशनाच्या वतीने शनिवारी टीप टॉप येथे सोनाली लोहार यांच्या बाकी काही नाही या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा पार पडला. अभिनेते आणि कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी सोनालींच्या कवितांचे कौतुक करताना त्यातील संवेदनशीलता, हळुवार भावना आणि प्रेमाच्या नाजूक छटांची दखल घेतली.
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कविता सोप्या वाटू शकतात, पण त्यातील नैसर्गिकता आणि तरलता हेच खरे कलेचे मोल आहे, असे म्हंटले आहे. अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी पुस्तकाच्या महत्त्वावर भर देत, लेखक आणि वाचक यांच्यातील संबंध आणि सर्जनशीलतेवर विचार मांडले. तर ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत भोजेकर आणि मंदार फणसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कवयित्री सोनाली लोहार म्हणाल्या की, तिची कविता ही वेदना आणि विरह यांची जिवंत आठवण आहे, जी तिला नव्याने पाहण्याची आणि जगण्याची ताकद देते. प्रकाशक गीते शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तर चैताली कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.