जुन्या वादातून मित्राची हत्या
दोन महिलांसह पाच जणांना अटक
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : जुन्या किरकोळ वादातून तीन भावांनी मिळून त्यांच्या एका मित्राची हत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ४) रात्री शांतीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. जिशान अन्सारी (वय २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जिशान आणि आरोपी हसन मेहबुब शेख (वय २२), मकबुल मेहबुब शेख (वय ३०), आणि हुसेन मेहबुब शेख (वय २८) हे तिघे भाऊ एकाच गोदामात हमालीचे काम करत होते. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी शुल्लक वादातून भांडण झाले होते. याच रागातून हसन, मकबुल, हुसेन यांच्यासह सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजीद यांनी जिशानच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. याच वेळी जिशान घरी दुचाकीवरून आला असता, हसनने त्याला लाथ मारून खाली पाडले. ही लाथ वर्मी लागल्याने जिशानचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शांतीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत जिशानच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हसन, मकबुल, हुसेन, सुलताना आणि आसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.