रिक्त जागेवर सरकारने त्वरित घरे बांधावीत
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा इशारा
शिवडी, ता. ५ (बातमीदार) ः मुंबईतील रिक्त जमिनीवर राज्य सरकारने त्वरित घरे बांधावीत अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढेल, असा सावधगिरीचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शनिवारी (ता. ४) आयोजित गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला आहे.
गिरणी कामगारांच्या घरांच्या अनिर्णित प्रश्नावर बोलताना गोविंदराव मोहिते यांनी म्हटले, की वरळी येथील सेंच्युरी मिलची लीज संपल्यानंतर सहा एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे. ती जमीन गिरणी कामगारांनाच घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. ती जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी न देता अन्य विकसकांना विकास करण्यासाठी दिल्यास कामगारांवर अन्याय होईल, असे त्यांनी सांगितले.
एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील घराबाबत ते म्हणाले, की केंद्र सरकारने एनटीसीच्या १४ गिरण्या अद्याप बंद ठेवल्या आहेत. त्या जमिनी अन्य विकसकाला दिल्यास गिरणी कामगारांना घरे मिळणे दुरपास्त होऊन बसेल. केंद्र सरकार गिरण्या चालवू शकत नसेल तर गिरण्यांच्या जमिनी कामगारांना घरे बांधण्यास मिळावयास हव्यात. तेव्हा सरकारने या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत, अशी भूमिका मोहिते यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.