मुंबई

दिवाळीपूर्वी दिवे विझण्याची वेळ

CD

पालघर, ता. १२ ः दिवाळी तोंडावर असताना पालघर जिल्हा परिषदेच्या तब्बल बाराशे कंत्राटी शिक्षकांना चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षकांची वाईट अवस्था बनली आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत पगारापोटी तब्बल नऊ कोटी ४० लाखांची राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही निधी मिळालेला नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढत असताना कंत्राटी शिक्षक मात्र खोलात रुतत चालले आहेत. या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात असून पैसा नसेल तर नियुक्ती का देता, असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे कंत्राटी मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती दिली आहे. काही शिक्षकांना १६ हजार रुपये प्रति महिना, तर सेवानिवृत्त प्रवर्गातील काही शिक्षकांना २० हजार रुपये प्रति महिना पगार ठरवण्यात आला आहे; मात्र जूनपासून आतापर्यंत पगारच दिलेला नसल्यामुळे हे शिक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक शिक्षकांची अवस्था वाईट असून मुलांची शिक्षण, घरचा खर्च आणि कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे.

राज्य सरकारकडून याआधी एक कोटी ४४ लाखांचा निधी आला होता. त्यातूनही केवळ मार्चचा पगार शिक्षकांना दिला गेला. आता राज्याकडून एक कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त आहे; मात्र तो कोणकोणत्या शिक्षकांना वाटप करणार, असा यक्षप्रश्न जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे. या निधीचे नियोजन करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला घाम फुटणार आहे. नेमक्या कोणत्या शिक्षकांना पगार काढावा, असा प्रश्न जिल्हा परिषदेला पडला आहे. १६ हजार रुपये पगार असलेल्या शिक्षकांना पगार दिला, तर वीस हजार रुपये पगार असलेले शिक्षक बोंबाबोंब करतील. त्यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.

कुटुंबीयांची तारांबळ
जिल्ह्यातील बाराशे शिक्षकांची दिवाळी पगाराविना कडू होणार आहे. कुटुंबीयांसह त्यांच्या मुलाबाळांची दिवाळी कोरडी जाणार असल्यामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एक कोटी ६१ लाखांचा निधी सरकारकडून प्राप्त झाला असला तरी तो जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पडून आहे. अजूनही तो जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे हा निधी तरी कधी वर्ग होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या आठवड्यात शिक्षकांना पगार झाले नाही, तर शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

शिक्षकांच्या वेतनाच्या निधीची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. हा निधी मिळताच शिक्षकांना तातडीने तो वितरित केला जाईल.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT