मुंबई

रायगडात भातकापणीची कामांना जोर

CD

रायगडात भातकापणी कामाचा जोर
नुकसानीनंतर उर्वरित पीक वाचवण्‍याची शेतकऱ्यांची धडपड
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः परतीच्‍या पावसाने रायगड जिल्‍ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. दरम्यान, उर्वरित क्षेत्रातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी कापणीच्या तयारीला लागला आहे. सध्या पावसाने काढता पाय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना या जातींना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने पिके बहरली आहेत. शेतकरी कापणीच्या कामात व्यग्र आहेत. दुपारी उन्हाचा तडाखा वाढत असल्‍याने सकाळच्‍या वेळेत लवकर कापणीची कामे केली जात आहेत. नवरात्र संपताच शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असून, चार दिवसांपासून अलिबागसह जिल्ह्यातील विविध भागांत कापणी सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंदा वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरी ८३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी योग्‍यवेळी योग्‍य प्रमाणात झालेला पाऊस भातशेतीसाठी पूरक ठरला. त्‍यामुळे यंदा भाताचे पीक चांगले आले आहे. गणेशोत्‍सवाच्‍या काळात लोंब्‍यांमध्‍ये दाणा भरण्‍यास सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी आणि नंतरच्या काळात झालेल्‍या पावसाने जिल्‍ह्याच्‍या अनेक भागांत उभी पिके आडवी झाली. दाणा भरलेली कणसे शेतात साचलेल्‍या पाण्‍यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाच्‍या पंचनाम्‍यानुसार हे नुकसान अंदाजे दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिकच्‍या क्षेत्रावर झाले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कापणी हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागात मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. दिवसाला ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळत असून, हे काम २० ते २५ दिवस चालणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
......................
चैकट
परतीच्या पावसामुळे धाकधूक कायम
पावसाचा जोर ओसरला असला तरी परतीच्या पावसाचा धोका अजूनही कायम आहे. संध्‍याकाळच्‍या सुमारास ढग दाटून येत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढत आहे. अजूनही अनेक ठिकाणी शेतामध्‍ये पाणी साचून राहिले आहे. कापलेले भातपी‍क अंगणात किंवा रस्‍त्‍यावर वाळवून त्‍याची तातडीने मळणी केली जात आहे. पेझारी ते नागोठणे मार्गावर हे दृश्‍य सर्रास पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT