कासा (बातमीदार) : श्रमजीवी संघटनेच्या वतीने ‘माणूस हाय मानुसकीची भीक नको, हक्क हवा!’ अशा घोषणांसह सोमवारी (ता. १३) दुपारी सागरनाका येथून डहाणू तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध गावांतील आदिवासी व कातकरी समाजाचे लोक सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे उलटून गेली असली तरीही आदिवासी समाज आजही घराखालील जागा, रेशनिंग, आरोग्य सुविधा, पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. सरकारच्या शबरी, आदिम, रमाई, आवास, तसेच पंतप्रधान आवास योजनांअंतर्गत असतानाही हजारो आदिवासी व कातकरी कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. जातीचे दाखले न मिळाल्याने अनेक जणांना शासकीय योजनांचा लाभ घेता आलेला नाही, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले. या मोर्चात हरिश्चंद्र उंबरकर, रूपजी चुंबळे, रामी वेडगा, जितू पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.