मुंबई

ऐन सणा सुदीत कचऱ्यामुळे बकालता

CD

कचऱ्यामुळे म्हसोबा चौकात अस्वच्छता
दिवाळीतही परिस्थिती कायम; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

कल्याण, ता. २० (बातमीदार) : महापालिकेच्या ‘४ जे’ प्रभाग क्षेत्रांतर्गत म्हसोबा चौकापासून काही अंतरावर असलेल्या गायत्री प्राथमिक विद्यालयाजवळ, रस्त्याकडेला ऐन दिवाळीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, यामुळे परिसराला बकालपणा आलेला आहे.

महापालिकेने नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून एक कचराकुंडी या ठिकाणी ठेवली आहे; मात्र ही कुंडी सतत ओसंडून वाहत असून, परिसरात वारंवार कचऱ्याचा मोठा ढीग साचत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकार फक्त एक दिवसापुरता मर्यादित नसून, काही दिवसांनी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते. नवरात्रीतही अशीच परिस्थिती होती. महापालिकेच्या सफाई यंत्रणेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरते, तसेच मोकाट श्वान आणि डासांचा त्रास वाढल्याचेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

नवरात्रोत्सव काळात ‘सकाळ’ने यासंदर्भात लक्ष वेधले होते; मात्र दिवाळीत पुन्हा तशीच परिस्थिती उद्‍भवल्याने प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. जबाबदार नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून रस्त्यावर ओसंडून वाहत असलेला कचरा उचलला जातो, परंतु काही दिवसांत पुन्हा तशीच परिस्थिती उद्‍भवते. महापालिकेने या ठिकाणी नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी आणि कचराकुंडीची क्षमता वाढवावी, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

कोळसेवाडीकडून म्हसोबा चौकाकडे जाणारा हा मार्ग निमुळता असून, रस्त्यावरील जागा कचऱ्याने व्यापल्यामुळे दिवाळीत सायंकाळी गर्दीच्या वेळी परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. तसेच, शहरातील अन्य काही भागांतही कचराकुंड्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने रस्त्यावरच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत रस्त्यावरच कचरा दिसल्याने परिसराला व परिणामी शहराला बकालपणा येतो. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेसाठी चाललेली महापालिकेची धडपड व्यर्थ ठरून शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न उभा राहू शकतो.

व्यापाऱ्यांनी पाळावी शिस्त
परिसरातील काही बेशिस्त नागरिक व काही व्यापारी प्लॅस्टिक, थर्मोकोल व इतर प्रकारचा कचरा सदर कचराकुंडी परिसरात रात्रीच्या सुमारास आणून टाकतात. त्यांनी हा कचरा इतरत्र पसरवू नये, स्वतःमध्ये स्वच्छतेची शिस्त लावावी, अशा सूचना सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहेत.

पाहुण्यांसमोर मान खाली घालण्याची वेळ
दिवाळी सणानिमित्त भाऊबीज, पाडव्यासाठी नातेवाईक घरी येत असतात, मात्र घरी येण्यापूर्वी रस्त्यावरील कचरा त्यांच्या निदर्शनास आल्याने शहराचा बकालपणा दिसून येतो. आपण राहत असलेल्या परिसरात अशी परिस्थिती असल्याने पाहुणे मंडळींसमोर मान खाली घालावी लागत असल्याची खंत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT