मुंबई

घरोघरी नवचैतन्य

CD

वसई, ता. २० (बातमीदार) : दिवाळीचा उत्साह घरोघरीच नाही, तर सर्वत्र जाणवत आहे. दिवाळीचे पहिले अभ्यंग स्नान सोमवारी (ता. २०) करून वसई तालुक्यातील नागरिकांनी फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला, तर फटाके फोडण्यात बच्चे कंपनी मग्न झाली होती. तसेच रसिकांनी पारंपरिक गाण्याचा आनंद घेत दिवाळी उत्सव साजरा केला.

दिवाळीनिमित्त घराच्या अंगणात महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढत पणत्या लावल्या. सकाळी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर कुरकुरीत, खमंग गोड-तिखट फराळावर ताव मारण्यात आला. सकाळपासून उत्साहाचे वातावरण दिसून आले. सर्वत्र झगमगाट पाहवयास मिळाला. घरगुती तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. नोकरी, व्यवसाय करत असताना घरी फराळ तयार करण्यास वेळ नसल्याने बाहेरून खरेदी करण्यात आला आहे. नागरिकांना भेट वस्तू देता यावी, म्हणून मोठ्या प्रमाणात दुकानांना ऑर्डर देण्यात आली. राजकीय पक्षांकडून अभ्यंगस्नानासाठी लागणारे उटणे, फराळ, तसेच मिठाईचे वाटप देखील ठिकठिकाणी करण्यात आले.

वाहतूक कोंडी
सुट्टी असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले खरेदीकडे कल दिसून आला, तर काहींनी फिरण्याचा आनंद लुटला, मात्र या दरम्यान वसई-विरार शहरातील प्रमुख मार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

समाजमाध्यमांवर शुभेच्छांची बरसात
सकाळपासून नागरिक एकमेकांना दिवाळी शुभेच्छा देत होते, तर ज्यांना भेटता आले नाही, त्यांनी विविध समाजमाध्यमांचा वापर केला. शुभेच्छांची बरसात सुरू असल्याचे दिसून आले.

मंदिरात गर्दी
वसई तालुक्यातील विविध भागात असणाऱ्या मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नवीन कपडे परिधान करण्यात आले होते नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने करण्यात आली.
---
झेंडूच्या फुलांना विशेष पसंती
जव्हार (बातमीदार) : दिवाळीच्या उत्सवी वातावरणात लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी फुलांची मागणी चांगली आहे. झेंडू, शेवंतीसह विविध रंगीबेरंगी फुलांनी बाजारपेठ खुलून गेली आहे. घर, दुकाने आणि कार्यालयांच्या सजावटीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, झेंडूच्या फुलांना व्यापाऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.

या वर्षी फूलबाजारात आलेल्या मालातील निम्म्या फुलांचा दर्जा घटला असला तरी मागणी तेजीत असल्याने दर समाधानकारक मिळत आहेत. दरवर्षी लक्ष्मीपूजनासाठी शेतकरी फुले राखून ठेवत असतात, मात्र यंदा पाऊस लांबला. त्याचा मोठा फटका विविध प्रकारच्या फुलांना बसला आहे. त्यामुळे झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. चांगल्या फुलांचे प्रमाण केवळ ५० टक्के आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांना चांगला दर मिळाला, मात्र ग्राहक आणि हार विक्रेत्यांकडून फुलांना चांगली मागणी असल्याने बाजारपेठेत दाखल झालेल्या बहुतांश मालाची विक्री झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT