मुंबई

अवकाळीने शेतकरी मेटाकुटीला

CD

अवकाळीने शेतकरी मेटाकुटीला
३२ हजार हेक्टरवरील भात-नाचणीचे पीक उद्ध्वस्त

शहापूर, ता. २६ (वार्ताहर) ः पावसाचा हंगाम संपल्यानंतरही शहापूर तालुक्यात गेले काही दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील भात आणि नाचणीच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. शनिवार (ता. २५) रात्रीपासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने दुसऱ्या दिवशीही तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले, ज्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. भातपिकाचे २० हजार हेक्टर आणि नाचणीचे १२ हजार हेक्टर, अशा एकूण ३२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच समाधानकारक सरकारी मदत मिळत नसल्याने तसेच विम्याचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शनिवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी दुसऱ्या दिवशीदेखील तालुक्याला झोडपून काढले आहे.

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक शेतातच कुजून गेले आहे. कापणी करून वाळत घातलेल्या भाताला कोंब फुटू लागले आहेत, तर काही ठिकाणी भाताची पेंडी पाण्यात तरंगताना दिसत आहे. खळ्यांमध्ये रचून ठेवलेले पीकही ओलसरपणामुळे सडू लागले आहे.

तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झाले नसून गावात एकाच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे एकच अंदाज लावून पंचनाम्याच्या एकाच निकषात नोंदले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात शेतकरीवर्ग कृषी आणि महसूल विभागाला सहकार्य करणार नाही, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी
एकीकडे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याला रडवले असताना, दुसरीकडे सरकारी मदत मिळत नसल्याने तसेच पंचनामे योग्य निकषांवर होत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गावात केवळ एकाच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, त्याच निकषांवर सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर केला आहे. या नैसर्गिक आपत्तीत लोकप्रतिनिधींनी सरकारी पातळीवर आवाज न उठवल्यामुळे आणि शेतकऱ्यांची साधी चौकशीही न केल्यामुळे, येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. नैसर्गिक संकटात सापडलेला शेतकरी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत.

पंचनाम्यात घोळ
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झाले नाहीत. विशेष म्हणजे, महसूल कर्मचाऱ्यांनी गावात केवळ एकाच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, त्याच निकषात आणि एकाच अंदाजात सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

भविष्यात असहकार
महसूल कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरीवर्ग कृषी आणि महसूल विभागाला सहकार्य करणार नाही, असे परखड मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नुकसानीचा आकडा
भाताचे पीक : २०,००० हेक्टर क्षेत्र
नाचणीचे पीक : १२,००० हेक्टर क्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT