मुंबई

कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरेल

CD

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यासह कोकणात अवकाळीने हाहाकार माजविला असून भातपिकाचे अतोनात नुकसान केले आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही; मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा करत कुणबी सेना आक्रमक झाली आहे. नुकसानीचा योग्य मोबदला आणि कर्जमाफी दिली नाही, तर राज्यात सुरू असलेल्या शेतकरी मोर्चात उतरण्याचा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे.

स्वातंत्र्यापासून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या चुकीची भरपाई करण्याची वेळ या सरकारवर आली आहे. मागील सहा महिन्यांपासून निसर्गाने केलेल्या कोपामुळे उभे पीक आडवे झाले आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. २९) कुणबी सेनेची आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या आंदोलनात कुणबी सेना सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढेल, असे पाटील यांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी सरकारने सतर्क राहायला पाहिजे. अनेक वेळा सरकारने अशा घोषणा केल्या; मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने वारंवार केले आहे. कोकणात भात हे एकमेव पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून भातपिकाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर आहे. कुणबी सेना बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यास शेतकरी आंदोलनाची धग कोकणातदेखील उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वजाची सन्मानपूर्वक विल्हेवाट कशी लावावी? वाचा कायदा काय सांगतो

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

Horoscope : 26 जानेवारीनंतर धनयोग सुरू! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक येतील पैसे अन् प्रेमात यश, ऐकायला मिळेल मोठी खुशखबर

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

SCROLL FOR NEXT