अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : वैकुंठ चतुर्दशीच्या मुहूर्तावर मनोहर कला सांस्कृतिक महिला मंडळ संस्थेतर्फे मंगळवारी (ता. ४) तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. सनईच्या मंगल सुरात, टाळ-घंटांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत पार पडलेल्या या सोहळ्याने जुन्या परंपरेला नवसंजीवनी दिली, अशी भावना उपस्थित वऱ्हाड्यांनी व्यक्त केली.
पूर्वी तुळशी वृंदावन हे प्रत्येक घराच्या अंगणातील श्रद्धा आणि संस्कारांचे प्रतीक मानले जात असे. कार्तिक महिन्यातील वैकुंठ चतुर्दशीला घराघरांत तुळस आणि श्रीविष्णू (शालिग्राम) यांचा विवाह पारंपरिक विधीने होत असे. तुळशीला नवरीसारखे सजवणे, हळदी-कुंकवाने पूजा करणे आणि लग्नगीते यातून कौटुंबिक स्नेहभाव आणि सामाजिक एकतेचा सण साजरा केला जातो. मनोहर कला महिला मंडळ दरवर्षी हा सण साजरा करून तरुण पिढीला संस्कृतीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षीही तुळसी माता आणि श्रीकृष्णदेव यांच्या रूपात विवाह विधी पार पडले. सर्व महिला पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाल्या. परिसर फुलांनी आणि दिव्यांनी उजळला. कार्यक्रमाला मनोहर कला मंडळाच्या संचालिका संध्या म्हात्रे, तसेच सुयोग मंडळ, योगिनी मंडळ आणि उत्कर्ष मंडळ या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्षा सुजाता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. महिलांसह लहान मुले आणि वयोवृद्धांनी उपस्थित राहून तुळशी विवाहाच्या मंगल सोहळ्याचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.