तालुक्यातील समस्यांवर उपाययोजना करा
भाजपचे शिष्टमंडळ विक्रमगड तहसीलदारांच्या भेटीला
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या विक्रमगड तालुका समितीतर्फे तालुका अध्यक्ष रवींद्र भडांगे यांच्या नेतृत्वाखालील एका जम्बो प्रतिनिधी मंडळाने नुकतीच विक्रमगड तहसीलदार यांची भेट घेतली. तालुक्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
बैठकीतील प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप तातडीने करावे. आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना मिळणारा बोनस लवकरात लवकर द्यावा. इमारत बांधकाम मजूर नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात. खावडा प्रोजेक्टच्या टॉवर कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित प्रशासनाने तत्काळ करावी. पाली ते तलवाडा मार्गावरील खड्डे आणि धुळीच्या प्रदूषणावर संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशा महत्त्वाच्या मागण्या या वेळी करण्यात आल्या.
याशिवाय तालुक्यातील अन्य स्थानिक व प्रशासनिक विषयांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. तहसीलदारांनी प्रतिनिधी मंडळाच्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत प्रत्येक विषयावर ठोस आणि तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.