मुंबई

नगराध्यक्षपदाचा ‘एकाधिकार’ ठाकरे गटाला महागात;

CD

बदलापूरमध्ये महाविकास आघाडी दुभंगली
ठाकरे गटाच्या कथित मनमानी कारभाराचा फटका; मनसेची फारकत, काँग्रेस शहराध्यक्षांचा राजीनामा
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे उघड झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असताना आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कथित मनमानी कारभारामुळे आघाडीला मोठे धक्के बसले आहेत. या तणावाचा परिणाम म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी आपला राजीनामा जाहीर केला. जाधव यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून आघाडी सावरत नाही तोच आता मनसेनेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करीत आघाडीच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

बदलापूर आघाडीत समन्वय आणि सुसंवादाचा अभाव असल्याचा आरोप घटक पक्षांनी केला आहे. उबाठा गटाने एकतर्फी निर्णय घेणे चालू ठेवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादाचे मूळ नगराध्यक्ष पदाच्या निवडीत आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत इतर पक्षांना पूर्णपणे बायपास करीत चर्चा न घेता प्रिया गवळी यांचे नाव एका महिन्यापूर्वीच पुढे आणले गेले. ‘आघाडीचा नगराध्यक्ष हा फक्त ठाकरे गटाचाच’ असा ठराव स्थानिक पातळीवर लादल्याची भावना इतर पक्षांमध्ये आहे. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ब्लॉक शहराध्यक्ष संजय जाधव यांनी राजीनामा सादर केला. त्यांच्या राजीनाम्यातून उबाठा गटाच्या वागणुकीबद्दल आणि आघाडीतील असमतोलाविषयीची तीव्र नाराजी अधिकृतपणे समोर आली.

मनसेला सापत्न वागणूक
काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच मनसेनेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. मनसेने सुरुवातीला १२ जागांची मागणी केली होती. इतर घटक पक्षांच्या आक्षेपामुळे तडजोडीनंतर मनसेला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. या मर्यादित वाटपातही मनसेने नगराध्यक्ष पदासाठी संगीता चेंदवणकर (ज्यांना राज ठाकरे यांनी स्वतः मुरबाड विधानसभा २०२४ साठी उमेदवारी दिली होती) यांच्या नावाची मागणी केली. मात्र उबाठा गटाने या उमेदवारीला ठाम विरोध दर्शविला आणि आपले पसंतीचे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर सापत्न वागणूक दिल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.

निवडणुकीचे बदललेले गणित
काँग्रेस आणि मनसेने घेतलेल्या या निर्णयांमुळे बदलापूरमधील महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास तीन दिवस शिल्लक असताना झालेल्या या बिघाडीमुळे शहरातील निवडणुकीचे गणित बदलले आहे. काँग्रेस आणि मनसे आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की एखादे नवे राजकीय गठबंधन तयार करणार, हा प्रश्न सध्या बदलापूरच्या राजकीय चर्चेत केंद्रस्थानी आहे.
काँग्रेस आणि मनसेने घेतलेला हा निर्णय बदलापुरात ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत महागात पडणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT