उच्छेळीतील तलाव धोकादायक
घातक रासायनिक घनकचरा उचलण्याकडे दुर्लक्ष
तारापूर, ता. १५ (बातमीदार) ः उच्छेळी ग्रामपंचायत हद्दीतील तलावात घातक रासायनिक घनकचरा फेकल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, बोईसर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती, मात्र दोन महिने उलटूनही घनकचरा उचलला गेला नसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उच्छेळी ग्रामपंचायत हद्दीत अणुऊर्जा प्रकल्पालगतच्या परिसरात हा प्रकार घडला होता. तक्रारीनंतर २५ सप्टेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने स्लजचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. २९ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात तलावातील रासायनिक घनकचरा फूड-कोस्मेटिक, केमिकल प्रोडक्शन, कॅटलिस्ट किंवा टूथपेस्ट उत्पादन करणाऱ्या एखाद्या कारखान्यातील असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा कचरा घातक असल्याचेही अहवालात नमूद आहे, मात्र दोन महिने उलटून हा कचरा ‘जैसे थे’ आहे. तलाव परिसरात दूषित वास पसरलेला असून जलचर प्राणी, जनावरांना धोका कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
------------------------------
खर्चाबाबत पत्रव्यवहार
रासायनिक घनकचरा उचलून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक खर्चाबाबत मुख्य कार्यालयाची मंजुरी मागवली आहे. मंजुरी मिळताच घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असे तारापूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.