मुंबई

भातसा धरणाचा एक दरवाजा उघडला

CD

भातसातून २०० एमएलडी पाण्याचा विसर्ग
धरणाचा एक दरवाजा उघडला
शहापूर, ता. १५ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने शनिवारी (ता. १५) सकाळी ९ ते दुपारी ११ वाजेदरम्यान धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडला होता. या दोन तासांच्या कालावधीत धरणातून २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाण्याचा विसर्ग सुरू होता. बृहन्मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांनी धरणाकडे सुमारे २२०० दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. या मागणीनुसारच धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे उपअभियंता विनोद कंक यांनी सांगितले.
धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर, धरण परिसरातील आणि भातसा नदीकाठच्या गावकऱ्यांनी मात्र धरणाचा दरवाजा अचानक का उघडण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. धरणाचे व्यवस्थापन करताना परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचना देण्यात आली होती की नाही, याबाबत संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT