मुंबई

दहिसर टोलनाक्यावर वनमंत्र्यांचा तोडगा

CD

दहिसर टोलनाक्यावर वनमंत्र्यांचा तोडगा
मुंबई पालिकेची जकात नाक्याची जागा देण्याचे सुतोवाच
भाईंदर, ता.१५(बातमीदार): दहिसर टोलनाका स्थलांतर करण्यासाठी मुंबई पालिकेच्या जकात नाक्याची जागा मिळाली तर ही समस्या सुटेल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची उच्चस्तरीय बैठक घेण्याचे संकेत त्यांना दिले आहेत.
मिरा भाईंदरमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार नुकताच पार पडला. यावेळी दहिसर येथील टोलनाका मिरा भाईंदराच्या हद्दीत स्थलांतर कारायचा झाल्यास तेवढा रुंद रस्ता उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसईव-िरारच्या हद्दीत टोलनाका स्थलांतर करायचा झाल्यास त्याठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यामुळे स्थलांतरासाठी दोन्ही जागा योग्य नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आमदार नरेंद्र मेहता यांनी सविस्तर अभ्यास केला असून मुंबई महापालिकेच्या जकात नाक्याची जागा योग्य असल्याचे नाईक म्हणाले. तसेच टोलनाका स्थलांतराचा विषयावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
-------------------------
युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील
कोणाशी स्पर्धा करण्यासाठी जनता दरबार घेत नसल्याने नाईक यांना सांगितले. २००९ पर्यंत या शहराचे नेतृत्व केले आहे. त्यावेळी सातत्याने जनता दरबार घेत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच आगामी मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावनाही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांना सांगितले.
--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT