महाराजांच्या स्मारकावरून पत्रप्रपंच
नवी मुंबई मनसेचे उपमुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे तक्रार
जुईनगर, ता. १९ (बातमीदार): नेरुळ येथील शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा वाद चांगलाच रंगला आहे. मनसेतर्फे लोकापर्ण केलेला पुतळा पुन्हा महाराज बंदिस्त केल्याने मनसेने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे थेट व्यथा मांडली आहे.
नेरुळ शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरणासाठी सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. याबाबत पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी पत्र व्यवहारही अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी केला आहे. तरी देखील गेली ४ महिने महाराजांचा पुतळा झाकून ठेवण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण होते. मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी स्मारकाचे अनावरण केले. मात्र, हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगत पालिकेने पुन्हा पुतळा झाकून ठेवला आहे. त्यामुळे पालिकेविरोधात संतापाचे वातावरण आहे. याच अनुषंगाने मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.